स्वत:ला पुरोगामी सिद्ध करण्यासाठी ब्राह्मणद्वेष्टा असणं गरजेचं झालय.

ब्राह्मणांवर नेहमी एक आरोप केला जातो - त्यांनी समाजावर जातीव्यवस्था लादली हा.

पण ३-५% लोकं सगळ्या समाजावर काहीही लादू शकतात का? आणि ह्या ३-५% लोकांना विचारतय कोण?

१/९
तथाकथित पुरोगाम्यांसाठी ‘सनातन धर्म’ हा नेहमी ‘soft target’ राहिला आहे.

ख्रिश्चन धर्मात पण कॅथोलिक, प्रोटेस्टंट, ईस्टर्न ओरथोडोक्स आदि पंथ आहेत.

ह्यातला सगळ्यात मोठा पंथ म्हणजे कॅथोलिक चर्च. हा पंथ आजपण गरीब व भोळ्या जनतेला लूबाडून त्यांचं धर्मांतरण करवून घेतो.

२/९
कधी पुरोगाम्यांना ह्या धर्मांतरणांवर बोलताना ऐकलय?

इस्लाम मधे पण शिया, सुन्नी, अहमदिया हे भेद आहेत. सुन्नी तर शियांच्या जीवावर उठलेले असतात. अहमदियांना तर मुसलमान पण मानलं जात नाही.

पण आजपर्यंत कुठला ही पुरोगामी ह्या बद्दल आवाज उठवताना दिसला नाही.

३/९
बौद्ध धर्मात पण जातीवाद आहे. बौद्ध धर्मात तर जातीयवादाला संस्थागत केलं गेलं आहे.

आणि हे मी म्हणत नाहीये.

पुरोगीम्यांच्या लाडक्या कम्युनिस्ट इतिहासकारांनीच हे कबूल केलं आहे.

एवढं सगळं असून पण नेहमी हिंदुंनाच निशाणा बनवलं जातं. फक्त हिंदु सणांवर, परंपरांवर टीका केली जाते.

४/९
वैदिक सनातन संस्कृति ही ‘समतावादी’ होती.

ह्या समाजात जातीभेद किंवा लिंगभेद नव्हता.

पण हे कधीही सांगितलं जात नाही.

हे ऋग्वेदातले व अन्य धार्मिक ग्रंथातले काही श्लोक व त्याचे अर्थ आहेत.

जरुर वाचा👇🏼मला काय म्हणायचय हे तुम्हाला लगेच कळेल.

५/९
ह्या भारतभूमि वर अनेक महापुरुष होऊन गेले. आज त्यांना विविध जातींमध्ये विभाजलं जातं.

आणि हे करण्यात सगळ्यात पुढे हेच तथाकथित पुरोगामी असतात. हाच आहे का ह्यांचा पुरोगामीपणा?

हे पुरोगीमी नेहमी समाजात एकता आणायचा आव आणून ब्राह्मणांना शिव्या देऊन समाजात तेढ निर्माण करतात.

६/९
मुळात जातीयवाद हा नष्ट झालाच पाहिजे.

शिवछत्रपतींनी १८ पगड जाती एकत्र आणून आपल्याला हीच शिकवण दिली आहे.

स्वातंत्र्यवीर सावरकरांना देखील जातीभेद मान्य नव्हता. आणि तो मिटवण्यासाठी त्यांनी अथक परिश्रम देखील घेतले. रत्नागिरीतलं पतित पावन मंदिर ह्याचं साक्षी आहे.

७/९
पुरोगामी लोकांनी महाराष्ट्राची तर अक्षरश: वाट लावली आहे.

आधी ब्राह्मण-मराठा, ब्राह्मण-बहुजन समाजांमध्ये काड्या लावल्या.

आता #मराठा_आरक्षण ह्या मुद्द्यावरुन मराठा-दलित व मराठा-बहुजन समाजात काड्या लावणं सुरु आहे.

पुरोगाम्यांना प्रश्न विचारल्यानंतर त्यांची झालेली व्यथा👇🏼

८/९ https://twitter.com/thedarklorrd/status/1352871574437720064
जर खरंच सामाजिक एकता स्थापित करायची असेल तर आधी ह्या पुरोगाम्यांना नाकारायला हवं.

कुठल्यातरी एका समाजा विषयी जनतेच्या मनात विष कालवून समाजात एकता कधीच स्थापन होणार नाही.

आपण सर्वांनीच जात-पात विसरुन एकत्र येणं नितांत गरजेचं आहे म्हणजे ह्या पुरोगीम्यांचं दुकान बंद होईल.

९/९
You can follow @TheDarkLorrd.
Tip: mention @twtextapp on a Twitter thread with the keyword “unroll” to get a link to it.

Latest Threads Unrolled:

By continuing to use the site, you are consenting to the use of cookies as explained in our Cookie Policy to improve your experience.