अर्णव गोस्वामी चे व्हाट्सऍप चॅट्स लिक झालेत....त्यात १४-२-२०१९ च्या एका मेसेज मध्ये तो म्हणतोय कि "हा हल्ला आपल्यासाठी कमालीचा यशस्वी ठरलाय."
१४फेब्रु'१९, काय झालं होतं त्यादिवशी.?
पुलवामा मध्ये लष्कराच्या ताफ्यावर अतिरेकी हमला ज्यात आपले BSF चे ४०जवान शहीद झाले होते.
#Threadकर✍️
आणि हा निर्लज्ज व्यक्ती त्या हमल्यामुळे स्वतःच्या चॅनेलच्या यशस्वीतेची टिमकी वाजवतोय....काहीच कसं वाटत नाही.?

एवढी कशी गेंड्याची कातडी पांघरून बसलेत..?
अर्णव नव्हे, तो तर आहेच निर्लज्ज, माझा आक्षेप आहे तो विरोधीपक्षाला. @INCIndia आणि @INCMaharashtra ही मंडळी काय करतायेत यावर..?
बरं, पुढे अजून बघुया....
"Military Confidentials" नामक काही गुपिते असतात लष्कराची....ज्यात खुद्द लष्कराच्या जवानांना नियोजित मिशन्स ची कल्पना नसते तिथे बालाकोट एअर स्ट्राईक बद्दल अर्णव ला काही दिवस अगोदरच माहिती असल्याचं दिसतंय.
आणि त्यावर पार्थो दास समोरून काय म्हणतोय बघा,
"It would make easy for Big Man, He can sweep the polls easily"
आता इथे "बिग मॅन" कोण आणि "पोल्स" अर्थात निवडणूका कोणत्या हे सुज्ञास सांगणे न लागे.

म्हणजे पुलवामा मध्ये जवानांचे शहीद होणे आणि प्रत्युत्तरादाखल एअर स्ट्राईक करून सहानुभूती मिळवणे हे फक्त निवडणुकांसाठीच होतं का..??
तरीसुद्धा विरोधीपक्षाला जर यावर भाष्य करायचंच नसेल तर मग २०२४चा निकाल वेगळा सांगणे ना लागे.
किमान ग्राउंड लेव्हलवर तर उतरा,जनता तुम्हाला वीजय आयता हातात आणून नाही देऊ शकत.
परिवर्तन करायचं असेल तर जनतेत यावं लागेल,विरोधीपक्ष आहे हे जनतेला दाखवून द्यावं लागेल.
@bb_thorat
@prithvrj
याव्यतिरिक्त, तिकडे दिल्लीच्या सिमेवर कृषी आंदोलन सुरूये, आजवर केंद्र सरकारने हरतर्हेने प्रयत्न करून बघितले पण हे शेतकरी बांधव आपल्या मुद्द्यांवर आणि त्या जागेवर ठामपणे बसून आहेत....
मग यामध्ये केंद्र सरकार पाताळयंत्री खोपडीचा वापर न करतं तरच नवल होतं....
पंजाबचे शेतकरी नेते बलदेव सिंह सिरसा यांच्यावर UAPA कायद्यान्वये गुन्हा दाखल केला असून NIA ने तसा समन्स बजावल्याचे समजते आहे.
या UAPA कायद्यामुळे कुणाही व्यक्तीस देशविरोधी दाखवून दहशतवादी असल्याचा ठपका मारण्याचे स्वातंत्र्यच मिळालंय केंद्र सरकारला.
लोकशाही मार्गाने शांततेत चाललेल्या आंदोलनाची, एका लोकशाही राष्ट्रातच जर अशाप्रकारे वासलात लागणार असेल, तर हा देश आणि पर्यायाने त्याचे नागरिक म्हणून आपण सर्वजण कुठल्या दिशेने वाटचाल करत आहोत याचा पुनर्विचार होणं अत्यावश्यक आहे.

जनतेस परिवर्तन हवंय पण.,
त्यासाठी @INCIndia ने स्वतः एक सबळ विरोधीपक्ष म्हणून उभरायला हवं, जनतेसमोर यायला हवं.

"दे रे हरी, खाटल्यावरी" या उक्तीनुसार कुणी सत्ता घरपोच आणून देणार नाहीये.
कॉंग्रेसने आक्रमकपणे सरकारला जाब विचारायला हवा, एवढीच माफक इच्छा.
@AshokChavanINC
@Manikrao_INC
@MarathiDeadpool
You can follow @Nilesh_P_Z.
Tip: mention @twtextapp on a Twitter thread with the keyword “unroll” to get a link to it.

Latest Threads Unrolled:

By continuing to use the site, you are consenting to the use of cookies as explained in our Cookie Policy to improve your experience.