नागपूर जिल्हा
नागपूर हे महाराष्ट्र राज्याचे उपराजधानीचे शहर आहे व राज्यातील तिसरे मोठे शहर आहे. नागपूर हे भारतातील तेरावे मोठे नागरी क्षेत्र आहे.
नागपूर महाराष्ट्राच्या विदर्भ विभागातील सर्वांत मोठे शहर, नागपूर जिल्हा व राज्याच्या नागपूर विभागाचे प्रशासकीय
#threadकर #telegram
मुख्यालय आहे.
महाराष्ट्र विधानसभेचे हिवाळी अधिवेशन नागपुरात घेतले जाते. भौगोलिकदृष्ट्या देशाच्या मध्य भागात असलेल्या या शहरातच भारताचा शून्य मैलाचा दगड आहे.

नागपुरास ‘संत्रानगरी’ असेही संबोधतात कारण शहरातील संत्री प्रसिद्ध आहेत व संत्र्याची मोठी बाजारपेठ येथे आहे. नुकताच
शहराचा ३००वा वर्धापनदिन साजरा करण्यात आला.
या शहराची स्थापना गोंड राजाने केली असली, तरी भोसलेंच्या राज्यकाळात ते मराठा साम्राज्याचा भाग बनले.
ब्रिटिशांच्या ईस्ट इंडिया कंपनीने 19 व्या शतकात या शहराची सूत्रे हातात घेतली आणि सेंट्रल प्रोव्हिअन्स ॲण्ड बेरारची राजधानी @gpekmaratha
म्हणून नागपूरची घोषणा करण्यात आली.
पहिल्या राज्य पुनर्गठनानंतर नागपूरने आपला राजधानीचा दर्जा गमविला. तथापि, राजकीय नेत्यांमध्ये झालेल्या नागपूर करारानुसार नागपूरला महाराष्ट्राची दुसरी राजधानी करण्यात आले.

नागपूर शहराने भारतातील अनेक व्याघ्र प्रकल्पांना जगाशी जोडले असल्याने
नागपूरला भारताची व्याघ्र राजधानी असेही म्हटले जाते.
पुण्यानंतर महाराष्ट्रातील माहिती तंत्रज्ञान (आयटी) क्षेत्राकरिता महत्त्वाच्या असलेल्या शहरांमध्येही नागपूरचे नाव प्राधान्याने घेतले जाते.

झिरो माईलचे चिन्हांकन हे नागपुरातच आहे आणि ते भारताच्या भौगोलिक केंद्रंबिंदूचे संकेत
असल्यानेदेखील नागपूर हे देशाचे मध्यवर्ती शहर ठरले आहे.

कन्हान नदीची उपनदी असलेली नागनदी नागासारखीच वाहात असल्याने आधी या शहराचे नाग असे नाव पडले आणि या नाग नदीमुळेच नागपूर असे नाव ठेवण्यात आले.
काहींच्या मते, जुन्या नागपूरमधून नागनदी वाहात असल्याने या शहराचे नाव नाग नदीवरून
ठेवण्यात आले आहे आणि देशातील विविध शहरे, तालुका आणि गावांच्या नावापुढे ज्या प्रकारे पूर हे विशेषण देण्यात आले आहे, त्याचप्रकारे नाग या नावापुढे पूर असे नाव देण्यात आले.
याच अनुषंगाने नागपूर महानगर पालिकेच्या सिम्बॉलवर नाग दाखविण्यात आला आहे.
1920 च्या नागपूर अधिवेशनात असहकार
चळवळ सुरू करण्यात आली.

1947 मध्ये भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर सेंट्रल प्रोव्हिअन्स ॲण्ड बेरार भारताचा प्रांत बनले आणि 1950 मध्ये मध्यप्रदेश या नावासह भारताचे राज्य झाले. पुन्हा एकदा या राज्याची राजधानी नागपूरलाच करण्यात आले.
तथापि, 1956 मध्ये भाषिक आधारावर भारतातील
राज्यांचे पुनर्गठन करण्यात आले आणि नागपूर व बेरार प्रांत बॉम्बे राज्याकडे सोपविण्यात आले.
1960 मध्ये बॉम्बे राज्याचे विभाजन होऊन महाराष्ट्र आणि गुजरात या दोन राज्यांची निर्मिती करण्यात आली.
14 ऑक्टोबर 1956 रोजी नागपूर येथे आयोजित औपचारिक जाहीर मेळाव्यात डॉ. #बाबासाहेब #आंबेडकर
यांनी आपल्या असंख्य अनुयायांसमवेत बोद्ध धम्म स्वीकारला आणि दलित— बोद्ध चळवळ सुरू केली. ही चळवळ आजही सक्रिय आहे.

हा थ्रेड काॅपी असल्याने ज्याचे कष्ट त्याला क्रेडीट आहे..चुकले असेल तर दुरूस्त करावे..
उरलेली माहिती उद्याच्या थ्रेडमध्ये🙏🏻💯❤️

#नागपुर #Nagpur #Maharashtra #cp
You can follow @realkunal7.
Tip: mention @twtextapp on a Twitter thread with the keyword “unroll” to get a link to it.

Latest Threads Unrolled:

By continuing to use the site, you are consenting to the use of cookies as explained in our Cookie Policy to improve your experience.