इराण हा एक अधिकृत इस्लामिक देश आहे, जिथली ९९% पेक्षा जास्त लोकसंख्या मुसलमान आहे.

अशा इराण मधले एक जागतिक दर्जाचे दिग्दर्शक माजिद माजदी (नावात बरंच काही आहे) यांनी २०१५ साली एक चित्रपट काढतात ज्याचे नाव 'Mohammad:- The Messenger Of God'.

हा त्यावर्षी इराणची Academy Awards
साठीची Official Entry असतो आणि त्यावर्षी इराणमधे सगळ्यात जास्त व्यवसाय करणारा हाच चित्रपट असतो.

हा चित्रपट आता Digital Platform वर Release होत आहे आणि या चित्रपटावर भारत नावाच्या Secular देशात बंदी घालावी अशी मागणी 'रझा अकॅडमी' करते.

त्याची दखल थेट महाराष्ट्राचे गृहमंत्री घेतात
आणि केंद्र सरकारला पत्र लिहीतात. याआधीच रझा अकॅडमीने २०१५ साली या चित्रपटाचे दिग्दर्शक माजदी आणि संगीत दिग्दर्शक ए.आर.रहमान यांच्या विरोधात फतवा काढायचा प्रताप करून झाला आहे.
आता ही तिच रझा ॲकेडमी आहे ज्यांनी २०११ साली आझाद मैदान इथे केलेल्या एका आंदोलनाने दंगलीचे रूप घेतले होते.
ज्यात थेट महाराष्ट्र पोलिसांवर हल्ला करण्यात आला.

हे सगळं बघता खरंच काही प्रश्न उपस्थित होतात...

१) जो चित्रपट एका इस्लामिक राष्ट्रात प्रदर्शित होतो आणि त्यावर भारतासारख्या Secular देशात बंदी का घालावी??

२) जर एका इस्लामिक राष्ट्रात या चित्रपटाने काही अडचण नसेल आणि भारतीय
मुस्लिमांच्या भावना दुखावत असतील तर भारतीय मुस्लिम अधिक 'कट्टर' आहे हे मानायचे का??

३) रझा अकॅडमी ही भारतातल्या सर्व मुसलमानांचे प्रतिनिधित्व करते का??

४) जर एखाद्या चित्रपटाविरोधात अशी तक्रार एखाद्या हिंदू संघटनेने केली तर त्यातही महाराष्ट्राचे गृहमंत्री इतकीच तत्परता दाखवतील
का??

५) ज्या संस्थेच्या आंदोलनात थेट पोलिसांवर हल्ले झाले होते, अशा संस्थेची महाराष्ट्र गृहमंत्र्यांनी तत्परतेने दखल घेत त्याचे समर्थन करणे कितपत योग्य आहे??

६) इतकं होऊनही आम्ही जर भारतात मुसलमानांचे लांगुलचालन होत नाही असे म्हणत असू तर आम्ही नक्की कोणाची फसवणूक करतोय??
You can follow @abhi_hinduwagh1.
Tip: mention @twtextapp on a Twitter thread with the keyword “unroll” to get a link to it.

Latest Threads Unrolled:

By continuing to use the site, you are consenting to the use of cookies as explained in our Cookie Policy to improve your experience.