एकदा चालत घरी येत
होतो.रस्त्यात एका खांबावर कागद लावला होता.
जवळ जाऊन बघितलं तर लिहिलं होतं,"ह्या
रस्त्यावर काल माझी एक
पन्नास रुपयाची नोट हरवली होती.मला डोळ्यानं नीट्स दिसत नाहीये.ज्याला कोणाला पन्नास रुपयाची नोट मिळाली असेल त्याने ती कृपया खालील पत्त्यावर आणून द्यावी.”
हे वाचल्यावर का कुणास
ठाऊक त्या पत्त्यावर
जाण्याची इच्छा झाली.
मी त्या पत्त्यावर गेलो,
घरातुन एक म्हातारी काठीचा आधाराने बाहेर आली.घरात ती एकटीच राहत होती.तिला डोळ्यान नीट दिसत देखील नव्हतं.
मी तिला म्हटलं,"आजी,
तुमची हरवलेली ५० ची नोट मला मिळाली,ती मी द्यायला आलोय.घ्या तुम्ही.
हे ऐकून म्हातारी रडू लागली.म्हणाली,"बाळा,अजूनपर्यंत ५०-६० लोक मला ५०ची नोट देऊन गेलेत.मी अशिक्षित आहे.मला नीट दिसत देखील नाही.माझी ही अशी अवस्था बघून मला मदत करण्याच्या उद्देशाने कोणी तरी ते लिहिलय मला
माहित नाही."
खूप आग्रह केल्यावर आज्जीने पैसे घेतले
पण मला एक विनंती
केली
"बाळा,ते मी नाही लिहिलंय.माझी दया आली असेल म्हणून कोणीतरी लिहिलं असेल.
जातांना तू तो कागद फाडून टाक.”मी हो म्हणून ते टाळलं खरं; पण माझं अंतर्मन मला सांगू लागलं की हेच ५०-६० लोकांना
पण तिने सांगितलं असणार.
अद्याप कोणीच तो कागद फाडला नाही.
ज्याने कोणी त्या म्हातारीला मदत करण्यासाठी हा कागद लावला त्यांच्याप्रती कृतज्ञतेने मन भरून आले. कदाचित तोही गरीब असेल. स्वतः: ५० रु. देऊ शकत नसेल पण त्याने अनेकांच्या मार्फत म्हातारीला मदत पोहोचवली.
लोकांना मदत करण्याची फक्त इच्छा लागते. मार्ग आपोआप सापडतो.

कॉपी पेस्ट
You can follow @Avadhutwaghbjp.
Tip: mention @twtextapp on a Twitter thread with the keyword “unroll” to get a link to it.

Latest Threads Unrolled:

By continuing to use the site, you are consenting to the use of cookies as explained in our Cookie Policy to improve your experience.