ही 2018 मध्ये सोलापुरात घडलेली घटना आहे

एक शेतकरी त्यांनी उत्पादित केलेला कांदा विकण्यासाठी आडतदाराकडे (दलाल) जातो तेव्हा त्यांचा कांदा 1890 किलो भरतो
त्यातल्या 1056 किलो कांद्याला एक रुपया किलो प्रमाणे भाव भेटतो तर 834 किलो कांद्याला पंच्याहत्तर पैसे किलो याप्रमाणे भाव भेटतो.
म्हणजेच त्यांच्या 1890 किलो कांद्याची किंमत फक्त 1681 रुपये होते

आता त्या आडतदाराची तोलाई हमाली, कमिशन गाडी भाड याची किंमत होते तब्बल 2229 रुपये

म्हणजेच शेतकऱ्यांच्या एकूण कांद्याच्या किमती पेक्षा 548 रुपये जास्त याचा सरळ सरळ अर्थ असा की त्या शेतकऱ्याला त्याने घाम गाळून
पिकविलेल्या कांद्याचा एक पैसा भेटणार नाही उलट त्याच शेतकऱ्याला आडतदारालाच ( दलालाच ) 548 रुपये देणं आहे

अशी ही आपली दलालांच्या विळख्यात सापडलेली सत्तर वर्षापासूनची व्यवस्था आहे जी की शेतकऱ्यांच आर्थिक शोषण करत आहे त्या मुळेच गेल्या सत्तर वर्षापासून आजपर्यंत आत्महत्या थांबलेल्या
नाहीत अन दिवसरात्र कष्ट करूनही शेतकरी कर्जाच्या विळख्यात सापडलेला आहे

म्हणून मोदींनी या दलालांच्या विळख्यातून शेतकऱ्यांना बाहेर काढण्यासाठी रामबाण उपाय केला आहे शेतकऱ्यांनी उत्पादित केलेला माल जिथं कुठं जास्त बाजारभाव असेल तिथं तो माल विकण्याची मुभा दिलेली आहे अन विशेष म्हणजे
जुन्या व्यवस्थेला हात ही लावला नाही जुनी व्यवस्था आहे तशी कायम राहणार आहे

आता एवढं सगळं डोळ्यासमोर दिसत असुनही काही राजकारणी विरोध करत आहेत.
You can follow @ShriRajTripute_.
Tip: mention @twtextapp on a Twitter thread with the keyword “unroll” to get a link to it.

Latest Threads Unrolled:

By continuing to use the site, you are consenting to the use of cookies as explained in our Cookie Policy to improve your experience.