बृहत्तर महाराष्ट्राचे निर्माते: रणमर्द थोरले बाजीराव पेशवे

शुरस्य वंदे🙏🏼वीरस्य वंदे🙏🏼धीरस्य वंदे🙏🏼जय हो!

🚩ज्यानी राष्ट्र-धर्म संरक्षणार्थ आयुष्य पूर्ण वेचीले, शाहूछत्रपतींचे खास श्रेष्ठ सरदार ज्येष्ठ पेशवे श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे ह्यांना त्रिवार वंदन 🚩

(१/१४)
राऊंना पेशवेपद द्यावे किंवा नाही या विषयी प्रथम थोडासा वाद झाला होता. बहुतांनी राजश्रींकडे ह्याचा विरोध केलेला.

परंतु बाळाजी नानांनी जसा मराठ्यांचा बंडावा मोडून काढला तसे निजामाचे निवारण करण्यास बाजीरावंच योग्य आहेत अशी छत्रपती शाहू महाराजांची मनोमनी खात्री झाली होती.

(२/१४)
१७ एप्रिल, १७२० रोजी थोरले बाजीराव, पेशवे झाले. त्यावेळी ते केवळ १९ वर्षांचे होते.

पुढची २० वर्ष राऊंनी छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वप्न आणि छत्रपती शाहू महाराजांना दिलेलं वचन पूर्ण करण्यात घालवली.

पालखेड, मालवा, बुदेलखंड, गुजरात, जंजिरा, दिल्ली, भोपाळ, वसई...

(३/१४)
...अशा ४१ युद्धांमध्ये बाजीराव अजिंक्य राहिले.

राऊंनी निझाम-उल-मुल्क मीर कमरुद्दीन खान सिद्दिकी ऊर्फ पहिला आसफ जाह ह्याला २ वेळेला पाणी पाजले - पालखेडच्या युद्धात आणि भोपाळच्या लढाईत.

पण पालखेडची लढाई आणि त्यानंतरचा तह याला मराठ्यांच्या इतिहासात एक विशेष स्थान आहे.

(४/१४)
सपशेल पराभव झालेल्या निझामाने मुंगी-पैठण या गावात ६ मार्च, १७२८ रोजी तह स्वीकारला.

त्यानुसार:
१. छत्रपती शाहू महाराज हेच मराठा साम्राज्याचे एकमेव वारस असल्याचे निझामाने व पर्यायाने मोगल सम्राटाने मान्य केले.

२. मराठ्यांना दख्खनमधील चौथ व सरदेशमुखीचा हक्क परत केला गेला.

(५/१४)
३. मराठ्यांच्या देशमुखांना परत आपापल्या जहागिरी इनाम झाल्या.

४. महसूलाची थकलेली रक्कम निझामाने मराठ्यांस नजर करण्याचे कबूल केले.

निझाम व मोगल सैन्याशी झगडा करुन त्यांना आपल्या अटी मान्य करायला लावल्याने राऊंची कीर्ती भारतभर पसरली.

(६/१४)
येथूनच हिंदुस्थानात मराठा साम्राज्याची मुहुर्तमेढ रोवली गेली.

या प्रकरणामुळे राऊंबद्दलचा छत्रपती शाहू महाराजांचा आत्मविश्वास आणि प्रेम वाढीस लागले.

राऊंनी निझामाविरुद्ध वापरलेली रणनीती पुढे मराठ्यांनी अनेक लढायांत वापरली व भारतभर साम्राज्य पसरविण्यास सुरुवात केली.

(७/१४)
थोरल्या बाजीरावांनी कधीही देवधर्म यांचे अवडंबर केले नाही.

जाती-पातीच्या परिघात ते अडकले नाही आणि म्हणूनच बहुजन समाजातील सरदारांच्या/सैनिकांच्या मांडीला मांडी लावून ते जेवत, त्यांच्यात रमत. जे असेल ते खात.

माणसांची त्यांना फार चांगली पारख होती.

(८/१४)
शिंदे, होळकर, गायकवाड, पवार ही नंतरच्या इतिहासात गाजलेली माणसे, बाजीरावांनेच प्रथम टिपली होती.

राऊ हे एक संपूर्ण सैनिक होते. ते सैनिक म्हणून श्रेष्ठ पण सेनापती म्हणून श्रेष्ठतम होते. आपल्या सैनिकांवर त्यांचे अपार प्रेम होते. अश्वदलाचे ते सर्वश्रेष्ठ नेते होते.

(९/१४)
थोरल्या बाजीरावांनी पूर्ण निष्ठेने छत्रपती शाहू महाराजांची सेवा केली.

महाराजांचं पण राऊंवर तितकंच प्रेम होतं.

त्यांना पेशवेपद बहील करणं असो वा मस्तानीच्या बाबतीत त्यांच्या पाठिशी उभं रहाणं असो, छत्रपती सदैव राऊंच्या बाजूने होते.

(१०/१४)
२८ एप्रिल, १७४० मध्ये राऊंच्या अकाली मृत्यु झाला.

‘सारे माझेच आहेत. परंतु माणूस असा बाजीराव. मोठाच लौकिक महाराजांचा बाळाजीपंतानी केला. तदाधिक्य बाजीराव. तलवार बहाद्दरपणाची पराकाष्ठा. असा पुरुष झालाच नाही.’

-छत्रपती शाहू महाराजांची बाजीरावांच्या मृत्यू नंतरची भावना

(११/१४)
श्रीमंत थोरले बाजीराव पेशव्यांची छत्रपती शाहू महाराजांप्रती असलेली निष्ठा आणि छत्रपतींचं त्यांच्यावर असलेलं प्रेम व विश्वास ह्यातून आपल्या लक्षात येईल.

🚩।।श्री राजा शाहू नरपती हर्ष निधान,
बाजीराव बल्लाळ मुख्य प्रधान।।🚩

🚩थोरले बाजीराव पेशवे ह्यांना त्रिवार वंदन🚩

(१२/१४)
इतिहासकारांच्या नजरेतील बाजीराव👇🏼

अशा महापराक्रमी योध्याचं एका #Bollywood दिग्दर्शकाने ‘मानसिक संतुलन गमावलेला प्रेमी’ असं चित्रीकरण केलं.

दु:ख ह्याचंच वाटतं की कोणी ह्याच्यावर काही आक्षेप पण नाही घेतला.
संदर्भ:

1. Sardesai, Govind Sakharam. New History of the Marathas (1707-1772)

2. James Grant Duff, A History of the Marathas

3. Bernard Montgomery, 1st Viscount Montgomery of Alamein (1972). A Concise History of Warfare

4. पुण्याचे पेशवे

5. https://en.m.wikipedia.org/wiki/Baji_Rao_ 
You can follow @TheDarkLorrd.
Tip: mention @twtextapp on a Twitter thread with the keyword “unroll” to get a link to it.

Latest Threads Unrolled:

By continuing to use the site, you are consenting to the use of cookies as explained in our Cookie Policy to improve your experience.